पेशव्यांचे सेनापती असलेले निमगावजाळी चे त्रिंबकजी डेंगळे यांच्या वडिलांबरोबर मांची गावातील लोकांचे पूर्वज श्री.बाबाजी येथे आले असे मानले जाते.त्यांना या परिसरातील जमीन इनाम म्हणून डेंगळ्याकडून मिळाली होती.येथे धनगर लोकांची मालकी असलेला वाडा होता तो त्यांनी विकत घेतला.त्यांना दोन मुले होती-मानजी व कानजी.याच मानजी च्या नावावरून गावाचे नाव मांची (मानजीचा अपभ्रंश) व शेजारील गावाचे नाव कोंची(कानजीचा अपभ्रंश )पडले असे मानले जाते.गावात पिढ्यानपिढ्या पासून दर दहापंधरा वर्षानी येणाऱ्या राजस्थानी भाटांच्या चोपडीतून ही माहिती उपलब्ध आहे.
0 comments:
Post a Comment